शेतकरी अनेक संकटावर मात करुन आपले शेतीतील उत्पादन (Agricultural production) वाढवण्याचा प्रयत्न करत असतात.
![]() |
harbhara kharedi |
मात्र, कधी निसर्गामुळे तर कधी खरेदी केंद्रावरील अटी आणि नियमांमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये खूप वाढ होत आहे. अशातच राज्यातील हरभरा खरेदी (harbhara kharedi) केंद्र हे मुदतीपूर्वीच बंद झाल्याने शेतकऱ्यांमध्ये गोंधळ उडाला होता.
शेतकऱ्यांची अडचण आणि शिल्लक हरभऱ्याचे होत असलेले नुकसान याचा विचार करून राज्य सरकारच्या मागणी नंतर पुन्हा एकदा हरभरा खरेदी (harbhara kharedi) केंद्र ही सुरु करण्यात आलेली आहेत.
हरभरा खरेदी केंद्र सुरू :-
राज्यात बुधवार पासून हरभरा खरेदी केंद्र (harbhara kharedi center) ही सुरु करण्यात आलेली आहेत. आता हरभऱ्याला 5 हजार 300 इतका आधारभूत भाव मिळणार आहे. आता हरभरा harbhara उत्पादक शेतकऱ्यांना याचा खूप मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
हरभरा खरेदी (harbhara kharedi) केंद्र अचानक बंद झाल्याने शेतकऱ्यांची वाढलेली हरभऱ्याचे आवक पाहता काळजीचे वातावरण तयार झाले होते. ज्यापासून शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे.
हरभरा भाव :-
रब्बी हंगामात हरभऱ्याचे खूप आवक वाढली होती. त्याचवेळी खुल्या बाजारपेठेत या हरभऱ्याला 4 हजार 500 रुपये असा भाव आहे. जो हमीभाव आता 5 हजार 300 रुपये इतक्या प्रमाणत मिळणार आहे. यामुळे आता शेतकऱ्याच्या हरभऱ्याची चांदी होणार आहे.
हरभरा विक्रीसाठी नोंदणी करणे गरजेचे :-
आता शेतकऱ्यांना हरभरा harbhara विक्री केंद्र सुरू झाल्याने 3 हजार 678 शेतकऱ्यांना हरभरा विक्री करता येणार आहे. मात्र शेतकऱ्यांना यासाठी नोंदणी करणे अतिशय गरजेचे ठरणार आहे. शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी सातबारा उतारा, 8 अ, बॅंक पासबुक, आधारकार्ड, मोबाईल नंबर याची नोंद खरेदी करावी लागणार आहे.
No comments:
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो ?